
बारामती / संपादक ( शशिकांत खरात)
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा उद्या उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडणार आहे. राजभवन येथे होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, राज्यातील प्रमुख राजकीय नेते, मंत्री, आमदार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
सुनेत्रा अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या सत्ताकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा अनुभव लक्षात घेता, आगामी काळात विकास, महिला सक्षमीकरण आणि प्रशासनातील पारदर्शकता या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत असून, राज्यभरात या घडामोडीकडे लक्ष लागून राहिले आहे. शपथविधीनंतर त्या अधिकृतपणे उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








