कलम 113 – Weight Limits (वजन मर्यादा)
ठरवलेल्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणे बेकायदेशीर आहे.
उल्लंघन केल्यास दंड व कारवाईची तरतूद आहे. तसेच
कलम 114 – Overloading दंड
ओव्हरलोड असल्यास प्रति टन अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो.
वाहन जप्त करण्याची तरतूद आहे. तरी प्रशासन कारवाई का करत नाही.


बारामती (प्रतिनिधी) — शहर आणि ग्रामीण भागात सध्या ओव्हरलोड वाहनांचा धोकादायक सुळसुळाट झाला असून, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा कित्येक पटींनी जास्त माल वाहून नेणाऱ्या ट्रक, डंपर व हायवा रस्त्यांवर अक्षरशः दहशत माजवत आहेत.
दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या ओव्हरलोड गाड्या मुख्य रस्ते, वस्तीभाग, शाळा परिसर आणि चौकांतून बेफामपणे धावताना दिसतात. अरुंद रस्त्यांवरूनही मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि लहान मुलेही अपघाताच्या छायेत वावरत आहेत.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिस व संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी तर ठराविक ठेकेदारांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे.शाळकरी मुलांना व वृद्धांना अधिक धोका निर्माण होतो
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, “आज कारवाई नाही केली तर उद्या मोठी दुर्घटना घडेल.” त्यामुळे आता जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाने तातडीने कठोर पावले उचलून ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








